■ 'अंत' आणि एकांत ह्यापैकी आपण एकांतालाच जास्त घाबरतो
■ खराब अक्षर हे अर्धवट शिक्षणाचे लक्षण होय.
■ ज्ञान म्हणजे काय? इतिहासांचे आणि अनुभवाचे काढलेले सार.
■ नवं काहीतरी शिकण्यासाठी 'मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी
■ पुस्तकांच्या शिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे "आयुष्य "
■ विद्या विनयेन शोभते
■ हसा, खेळा पण शिस्त पाळा.
■ केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
■ कार्यात यश मिळो न मिळो, प्रयत्न करण्यास कुचराई करु नका.
■ कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल , तर अपयश पचविण्यास शिका.
■ खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी हि त्याच्या साठी नवीन काहीतरी शिकण्याची संधी असते
■ कधी तुम्ही जिंकत असता कधी तुम्ही शिकत असता
■ राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
■ देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.
■ चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
■ यश मिळवण्याच्या पुस्तकात अपयश हा महत्वाचा धडा आहे
■ कला म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर यांचे संमेलन.
■ यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
■ जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
■ बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.
■ चुक हि नवी संधी आहे कधी न शिकलेले शिकण्याची
■ छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही... अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते... कारण... छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात... पण... अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो.....!
■ दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, आत ज्योत ही हवीच.
■अन्न हे पूर्णब्रह्म आहे; त्याचा अनादर करू नका.
■ नम्रता हाच ज्ञानाचा आरंभ.
■ परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
■ प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
■ यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायर्या चढाव्या लागतात.
■ यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
■ वाचन हे मनाचे अन्न आहे.
■ वाचनासाठी वेळ काढा, तो शहाणपणाचा निर्झर आहे.
■ विचाराच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे.
■ "यशाइतकं बोलकं दुसरं काही नसतं"
■ आधी सिध्द व्हा, मग आपोआपच प्रसिध्द व्हाल
■ शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
■ अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.
■ अज्ञानाची फळे नश्वर असतात. ती सकाळी जन्माला येतात आणि सायंकाळी नष्ट होतात.
■ अर्धवट ज्ञानी म्हणजे दुःखाचा धनी.
■ कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.
■ खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
■ चारीत्र्यवान मनुष्यच खरा सुशिक्षित.
■ जो द्रव्य वाढवितो तो काळजी वाढवतो, परंतु जो विद्या वाढवितो, तो ज्ञान वाढवतो.
■ ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते.
■ ज्ञानाचे अंतिम लक्ष्य सुंदर चात्रित्र्य निर्माण करणे हेच असले पाहिजे.
■ दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित.
■ नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे.
■ परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
■माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
■ प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
■ प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे.
■ पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे.
■ पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही.
■ या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक.
■ वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
■ विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते.
■ विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
■ शब्दांसारख शस्त्र नाही, त्यांचा वापर जपुनच करावा.
■ शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
■ शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे, जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता.
■ शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो, तर विद्यार्थ्यालाच त्यातुन प्रवेश करायचा असतो.
■ समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तो आदर्श शिक्षाकांमुळे होतो.
■ स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक !
■ शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
■ स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.
■ दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही
■ त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी)
■ युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.
■ जगात काही अजरामर नाही तुमच्या चिंतासुध्दा!
■ जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते
.
■ लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.
■ आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.
■ सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.
■ माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.
■ दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुसयाला प्रजलीत करते.
■ आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.
■ सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !
■ उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.
■ जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.
■ संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.
■ ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.
■ शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.
■ कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!
■ मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.
■ अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.
■ चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.
■ काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.
■ कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.
■ उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.
■ कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.
■ पवित्र असावे पण पतित होऊ नये.
■ त्याग करावा पण ताठा नसावा.
■ स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.
■ आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.
■ स्वतंत्र असावे पण स्वैर नसावे.
■ घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.
■ माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.
■ सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर, परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा !
■ मानवी संबंध धावणाया आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात...ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.
■ श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.
■ ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते.
No comments:
Post a Comment